अहिल्याबाई होळकर निबंध मराठी | Ahilyabai Holkar Nibandh Marathi

मित्रांनो आज “अहिल्याबाई होळकर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. एक अतिशय दानशूर, कर्तुत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात जिल्हा बीड मानकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्याच्या पोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

Ahilyabai Holkar Nibandh Marathi

खंडेराव यांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार अहिल्याबाईंवरच सोपवत असत. “Ahilyabai Holkar Nibandh Marathi”

खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळायचे आहे”.

अहिल्याबाई होळकर निबंध मराठी

आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकर यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्या वेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.

मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. “Ahilyabai Holkar Nibandh Marathi”

आता खऱ्या अर्थाने अहिल्याबाई राज्यकर्ती झाल्या. पुढील 28 वर्षे त्यांनी राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशल पणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

Ahilyabai Holkar Nibandh Marathi

अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदार वृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्यकारभार करणारी ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली.

अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवान गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाई विरुद्ध संधान बांधले आणि इंदुर बळकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले.Ahilyabai Holkar Nibandh Marathi

राघोबांना हे अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडुन हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखी भर पडली.

अहिल्याबाईच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाईचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर, लुटारू, दरोडेखोर यांच्या राज्यात बंदोबस्त करील त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जात-पात बघितली जाणार नाही.

अहिल्याबाई होळकर निबंध मराठी

हा विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी कृती ही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या.

करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील, कुळकरण्यांच्या हक्कांचे वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. Ahilyabai Holkar Nibandh Marathi

तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडीत जमिनीची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार पट्ट्यांनी देण्याची पद्धत सुरू केली.

Ahilyabai Holkar Nibandh Marathi

राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (1772). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोध्दार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.

महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्र उद्योगास उत्तेजन दिले. कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली. आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेट कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभारात त्यांनी मनरुपसिंगसारख्या कुविख्यात डाकुला फाशी दिली. ‘Ahilyabai Holkar Nibandh Marathi’

होळकरांच्या टांकसाळीतीलल नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत. त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या.

अहिल्याबाई होळकर निबंध मराठी

उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रम शाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले.

स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ( स्नानगृह) ठेवल्या मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत. थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात. Ahilyabai Holkar Nibandh Marathi

Ahilyabai Holkar Nibandh Marathi

बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः आयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, , हृषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ,काशीविश्वेश्वर, विष्णुपाद आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर) त्र्यंबकेश्वर येथे नदीला घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी,रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली.

सप्तपुरे चार धामेया ठिकाणी घाट, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमी बाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाई यांच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरी जवळ खंडेराव यांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.Ahilyabai Holkar Nibandh Marathi

अहिल्याबाई होळकर निबंध मराठी

अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधु, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मीकि रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या.

विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदरसत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.

Ahilyabai Holkar Nibandh Marathi

अखेरच्या दिवसात त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला( 1790). तुकोजी होळकरांची सून आनंदीबाई यांचे देहावसान झाले.

त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने 1792 मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणांसही लाजवेल अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. “Ahilyabai Holkar Nibandh Marathi”

अहिल्याबाई होळकर निबंध मराठी

त्या अजातशत्रू होत्या. पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले. मध्यम उंचीची, सावळ्या वर्णांची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तुत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांच्या आयुष्यच सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

तर मित्रांना “Ahilyabai Holkar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “अहिल्याबाई होळकर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कोठे झाला?

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात जिल्हा बीड झाला.

Leave a comment