अण्णाभाऊ साठे निबंध मराठी | Annabhau Sathe Nibandh Marathi

Annabhau Sathe Nibandh Marathi – मित्रांनो आज “अण्णाभाऊ साठे निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Annabhau Sathe Nibandh Marathi

अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते.

साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.

त्यांनी दोन लग्न केलीत. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी पत्नी जयवंता साठे होत. त्यांना एकूण तीन आपत्य होती मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे निबंध मराठी

मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. “अण्णाभाऊ साठे निबंध मराठी”

गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. “गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध जाण्याची तुकड्याची” झाली भाकर या कवितेतून त्यांनी आपला मुंबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केलेला दिसतो.

अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे “जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव” असे अण्णाभाऊ म्हणायचे.

Annabhau Sathe Nibandh Marathi

आपल्याला अजमार साहित्यातून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणले. मुबई ही महाराष्ट्रातून वेगळी होऊ नये यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवाडा महाराष्ट्रात व भारतातच नाही तर रशिया मध्ये गायला.

त्यांनी आपल्या जीवन काळात विविध विषयावर लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या.

अण्णाभाऊ साठे निबंध मराठी

मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी… क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले.

अण्णाभाऊंच्या साहित्यातून समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसुन येते. वैजयंता आणि फकिरा ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

“माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काहीली. अशा सुंदर कविताही त्याच्या गाजलेल्या आहेत.

Annabhau Sathe Nibandh Marathi

“समाजात जगण्यासाठी
दिने ज्यांनी अभियानाचे स्थान….
साहित्य आणि लोककलेतून केला.
समाजाचा पुननिर्माण…..”

त्याचप्रमाणे पृथ्वी ही शेशनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरिबांच्या व कष्टकरांच्या तळहातावर तरलेली आहे. अशे अण्णाभाऊ म्हणायचे आणि हे त्यांचे विचार सत्य आहेत.

आणि या महान लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा १८ जुलै १९६९ ला मृत्यु झाला. म्हणून हा दिवस त्याचा स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो.

तर मित्रांना “Annabhau Sathe Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “अण्णाभाऊ साठे निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यु कधी झाला?

अण्णाभाऊ साठे यांचा १८ जुलै १९६९ ला मृत्यु झाला.

अण्णाभाऊ साठे यांना कोणता पुरस्कार मिळालेला होता ?

‘फकिरा’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला होता.

अण्णाभाऊ साठेंचा जन्म कधी झाला?

अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला.

Leave a comment