चला खेड्याकडे निबंध मराठी | Chala Khedyakade Nibandh Marathi

Chala Khedyakade Nibandh Marathi – मित्रांनो आज “चला खेड्याकडे निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Chala Khedyakade Nibandh Marathi

महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा त्यावेळी दिला होता. आज हा नारा हुबेहूब प्रत्येकाला लागू होत आहे covid-19 मध्ये कोरोनाच्या या महामारी मध्ये खेड्याचे महत्त्व प्रत्येकाला दिसून आलं. प्रत्येक जण खेड्याकडे धावू लागला.

कोरोना पासून वाचण्यासाठी अलिप्त राहण्यासाठी एक चांगल आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी लोकं गावाकडे येऊ लागले. हा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. लॉक डाऊन मुळे बऱ्याच लोकांचे रोजगार गेले. जे लोंढे चे लोंढे शहरात रोजगाराच्या निमित्ताने आले होते. ते पुन्हा गावाकडे जाताना आपण पाहिले. याकाळात खेड्याचे महत्व प्रत्येकाला जाणवले आणि लक्षात आले. (Chala Khedyakade Nibandh Marathi)

शांत व निरामय जीवन

गावाकडच्या लोकांचं आयुष्य हे खूप मोठं असतं. हे आपण अनुभवले, खूप पूर्वीपासून भारतीय संस्कृती मध्ये गावाकडची संस्कृती ही आरोग्यदायी संस्कृती म्हणून आपण ही अनुभवली. एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा खेड्यांमध्ये तंत्रज्ञान हे झपाट्याने पोहोचू लागलेलं आहे.

खेड्याकडचं जीवन म्हणजे निसर्गमय वातावरणामध्ये कष्ट करून स्वतः ला सुरक्षितता प्रदान करणारं जीवन, ज्याप्रमाणे शहरीकरणामध्ये गर्दीचे ठिकाण, गाड्यांचे गोंगाटाचं वातावरण हे शहरामध्ये दिसून येतं. मात्र खेड्यामध्ये याउलट आहे तुरळक वस्ती असलेल गाव त्या गावामध्ये शांतता असते. “Chala Khedyakade Nibandh Marathi”

जेव्हा आपण शहरांमधून गावाकडे जातो तेव्हा आपल्याला याची प्रचिती निश्चितच येते. खूप दिवसांनी गावाकडे आल्यानंतर असं शांत ठिकाणी आल्यानंतर शांत निरामय आयुष्य याप्रमाणे असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. ना प्रदूषण ना गोंगाट ना गर्दी याउलट निसर्गाच्या सानिध्यात राहून शुद्ध हवा, शांत निरामय जीवन म्हणजे खेड्याकडचे जीवन होय.

शुद्ध वातावरण

सकाळी सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घेत, सूर्याची कोवळे किरणे अंगावर घेत पहाटेच्या गावाकडील शुद्ध वातावरण म्हणजे स्वर्गात गेल्यासारखा आनंद होतो. मन अगदी तृप्त होऊन जातं. या प्रसन्न वातावरणात गावाकडचा फेरफटका मारण्याची मज्जा औरच. शहरात कधी तरी नजरेस पडणारा उगवता सूर्य गावाकडे नित्य नियमाने दररोज नजरेस पडतो. ‘Chala Khedyakade Nibandh Marathi’

प्रदूषण विरहीत निरभ्र आकाश, पक्षांचा चिवचिवाट, शुद्ध हवा, पाणी, चुलीवरचे बनवलेले जेवण, शास्वत शेती म्हणजेच शुद्ध वातावरणात नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे अन्न, पालेभाज्या या अशा खेड्यातील शुद्ध वातावरणात गावाकडची मंडळी निरोगी जीवन जगत आहेत.

प्रेमळ व आनंदी लोकजीवन

शहरामध्ये धावपळीच्या जीवन आपल्याला अनुभवायला येते. इथे कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही. अगदी शेजारी सुद्धा चार भिंती मध्ये बाहेर काय घडते? त्याच्याशी काहीही संबंध नाही.

मात्र खेड्यातील प्रत्येक माणूस हा माणूसपण जपणारा, एकमेकांना मदतीला धावून येणार, या गावकड्याच्या लोकांचे जीवन म्हणजे आनंदी आणि माणसे देखील तेवढीच प्रेमळ, आपुलकीने विचारपूस करणारी. एकमेकांच्या सुख, दुःखात सहभागी होणारी आनंदी, प्रेमळ माणसे म्हणजे खेड्याकडची. आजही सणानिमित् त शहरातील माणसे गावाकडे येतात. तेव्हा याची प्रचिती निश्चितच येते. आणि परत पुन्हा शहराकडे जाण्यासाठी पाय निघत नाही.

कोरोना संकट महामारी मध्ये लॉक डाऊन सुरू झाले तेव्हा याचा अनुभव नक्कीच आला. लोकं शहराकडून गावाकडे येऊ लागली तेव्हा. खेड्याकडच्या प्रेमळ माणसांनी माया दाखवत, कसलीही चिंता न करता लोकांना गावात घेतले. यापेक्षा प्रेमळ माणसे कोठे मिळणार. ‘चला खेड्याकडे’ हे पुन्हा कोरोनाने लोकांना दाखवून दिले. [Chala Khedyakade Nibandh Marathi]

निवांतपण

कष्टकरी शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबून काम करतो. तेव्हा सर्वांना शेतातील पिकलेलं अन्न मिळते. हा खेड्यातला शेतकरी खरा राजा आहे. दिवसभर काम करून रात्री निवांतपणे झोप घेणे हे काही शहराच्या लोकांच्या नशिबी नाही. शहरातल्या लोकांना तर म्हणे झोपण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. शांत बसायला निवांत वेळ नाही. ना कुणाशी बोलणं, ना कोणासोबत निवांत गप्पा मारणे याला शहरात मर्यादा.

याउलट गावकड्याच्या माणसांना शेतामध्ये दुपारच्या वेळेला घेतलेला विसावा. शांत ठिकाणी कुटुंबातील सदस्यांची गप्पा गोष्टी, निसर्गाच्या सानिध्यात एकांतपणे निवांत क्षण कोठे असेल तर तो गावाकडेच आज प्रत्येकजण निवांतपणा शोधत आहे. जेव्हा

शहरातला माणूस सुट्टीच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांना घेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा त्याला काही क्षणासाठी निवांत ठिकाणी आल्याचा क्षण अनुभवता येतो. रोजच्या धावपळीच्या जीवणापेक्षा तो सुट्टीमध्येनिवांत क्षण ठिकाण शोधत असतो. मात्र गावाकडची मंडळी रोजच निवांतक्षण अनुभवत असतात. हीच तर खरी किमया आहे. गावाकडच्या लोकांच्या दिर्घ आयुष्याची..

शाश्वत शेती

गावाकडून लोकं रोजगारनिमित्ताने शहरात आले. कोरोना संकट जेव्हा आले. तेव्हा पुन्हा लोकांनी आपल्या गावाकडची वाट धरली. शहरातली नोकरी काही शाश्वत नाही. नोकरी कायमस्वरूपी हमी नाही. सगळं कंत्राकीकरण झालं आहे. आणि मग एक दिवस लोकांना कोरोना संकटात गावाकडची शेती आठवू लागली.

शेती ही शाश्वत आहे. कायमस्वरूपी धन देणारी माती, म्हणजे माझी खेड्यातली माती. कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या गावाकडची लोकं शाश्वत शेती करत आहे. शाश्वत शेती मुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यात मदत होते. त्यासोबतच या शेतीत पिकलेलं अन्न म्हणजे नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले जे आरोग्यासाठी उत्तम असते. {Chala Khedyakade Nibandh Marathi}

रोजगाराच्या नविन संधी

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत आहे. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. एकीकडे मोठमोठ्या पदव्या घेऊन देखील युवक बेरोजगार झाले आहते. त्यातील काहीच शाश्वत शेती मध्ये करिअर करत आहेत. काहीजण वडिलांचा वारसा जपत आहे.

शेती ही युवकांसाठी आता रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. ती पूर्वी पासून होती. मात्र रोजगाराच्या स्पर्धेमुळे, वाढत्या शहरीकरण, कंत्राकी धोरण, नोकरीची हमी नाही. अशा अवस्थेत युवक आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. करण्याचा विचार करत आहे.

शेती सोबत जोडधंदा व्यवसाय देखील आधुनिक शेती पद्धतीमध्ये समोर येऊन नोकरी पेक्षा अधिक उत्पन्न देणारी शेती ही एक रोजगाराची नविन संधी उपलब्ध झाली आहे. भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो. फुल शेती, कुक्कुटपालन व्यवसाय,दुग्धव्यवसाय असे अनेक पर्याय पुढे आले आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकं आता शेतीकडे वळू लागले आहेत. “Chala Khedyakade Nibandh Marathi”

Chala Khedyakade Nibandh Marathi

महात्मा गांधीजींनी दिलेली हाक ‘चला खेड्याकडे’ ही आता वास्तवात उतरताना दिसून येत आहे. गावकडची प्रेमळ आनंदी लोकजीवन, निवांतपणा, शाश्वत शेती पध्दती आणि रोजगाराच्या नविन संधी या सर्वांगाने विचार करता राष्ट्र विकासासाठी ‘चला खेड्याकडे’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

तर मित्रांना “Chala Khedyakade Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “चला खेड्याकडे निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महात्मा गांधीजींनी कोणता नारा दिला होता?

महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा त्यावेळी दिला होता.

खेड्यातले जीवन कसे असते?

खेड्यातले जीवन शांत व निरामय असते.

Leave a comment