घड्याळ नसते तर मराठी निबंध | Ghadyal Naste Tar Marathi Nibandh

Ghadyal Naste Tar Marathi Nibandh – मित्रांनो आज “घड्याळ नसते तर मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Ghadyal Naste Tar Marathi Nibandh

आपल्या जीवनामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर चांगल्याप्रकारे करणे गरजेचे असते आणि आपल्याला वेळ दाखवण्याचे महत्त्वाचे काम घड्याळ करते. आपल्या जीवनात घड्याळाचे खूप महत्व आहे. आपल्या घरातील घड्याळ थोड्या वेळेसाठी बंद पडले तरी आपल्याला काहीतरी नसल्यासारखे वाटते.

मग ‘जे आहे, ते नसते तर।’ आणि ‘जे नाही ते असते तरा असा कल्पनांचा खेळ ( पसारा म्हणा हवं तर ) ते मांडीत बसते.घड्याळ नसतं तर छान झालं असतं, असं मला बालपणी वाटायचं खरं. विशेषतः त्याच्या कर्णकर्कश गजराने रोज माझ्या साखरझोपेचं खोबरं व्हायचं तेव्हा तर त्याच्यावर मी जाम भडकायची. वाटायचं, काय बिघडलं असतं हे नतद्रष्ट घड्याळच नसतं तर? {Ghadyal Naste Tar Marathi Nibandh}

पण घड्याळ बंद पडलेच तर मानवी जीवनातील वेळ नाहीशी होईल. दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशी कालगणना करता येणार नाही. माणसाचा जीवनकाळ ठरवता येणार नाही.

घड्याळ नसते तर मराठी निबंध

सर्व सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था कोलमडून पडेल. वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती वेळ आपल्याला घड्याळातून कळते. घड्याळाचे बंद पडणे म्हणजे आपल्या कामात आणि जगण्यात सुव्यवस्था राहणार नाही. कोणतीच कामे वेळेवर होणार नाहीत. कोणत्या गोष्टीला किती वेळ लागला पाहिजे त्यावर नियंत्रण राहणार नाही.

घड्याळ नसल्याचा एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे तणावमुक्तता! आपण सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त वेळेशी बांधले गेलेले आहोत. त्यामुळे आपले मन आणि विचार देखील सतत भविष्य आणि भूतकाळात गुंतलेले असते. जर घड्याळ बंद पडलेच तर प्रत्येक कामात जागरूकता आणि सातत्य येऊ शकेल.

आपले आरोग्य हे शारिरीक आणि मानसिक स्वरूपाचे असते. घड्याळ नसल्यावर अचानक मानसिक धावपळ नाहीशी होईल आणि आयुष्यात निवांतपणा येईल! कामे एकदम सुसंगत होतील. त्यामुळे सामाजिक प्रगती, औद्योगिक विकास मोजता येणारं नाही. व्यक्तीचे कौशल्य वाढत आहे की घटत आहे तेहा समजणार नाही. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक सुव्यवस्था नियोजित पद्धतीने राबवता येणार नाही. “Ghadyal Naste Tar Marathi Nibandh”

Ghadyal Naste Tar

घड्याळ बंद पडले तर वैयक्तिक स्तरावर फायदे आहेत पण कधी कधी व्यक्ती निवांत -राहून आळशी बनू शकतो. त्याच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा- कालखंड आणि मापदंड त्याला कळणार नाही. घड्याळाचा काटा सतत पाठीशी असल्यावर आपल्या आयुष्यात असणारी गती नाहीशी होईल.

घडयाळच नसेल तर मित्रमैत्रीणी किंवा कार्यालयीन व्यक्तीनां भेटीच्या वेळा कशा ठरवणार ? उशीरा किंवा लवकर पोहोचल्याने दुसऱ्याची वाट पाहण्यातच जास्त वेळ लागणार. घडयाळच नसेल तर वेळेचे गुलाम न बनता ‘खाओ, पिओ करो’ असेच केले तरी रोजच्या त्याच त्याच गोष्टी करण्याचा -उबग येईल. [Ghadyal Naste Tar Marathi Nibandh]

लोकांमध्ये शिस्त किंवा नियमावली राहणार नाही. त्यामुळं सगळीकडे अंदाधुंदी माजेल, एस्. टी., रेल्वे, विमानसेवा याना परिपत्रक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशाने आळशी लोकांना आनंद होईल पण कष्ट करणाऱ्यांना अशा गोष्टींचा त्रास होईल. सगळीकडे आळशीपणाचेच वातावरण राहिल. त्यामुळे अशा बेधुंद जगात राहण्यापेक्षा वेळेचे भान दाखविणारे तीन हातांचे हे घडयाळ माणसाला माणसाप्रमाणे, माणूसकीने जगायला शिकवते. पशुपेक्षा मानवजीवन वेगळे आहे याची जाणीव आणि घडयाळ, म्हणजेच वेळ पाहून काम करायला शिकवते.

तर मित्रांना “Ghadyal Naste Tar Marathi Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “घड्याळ नसते तर मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

घड्याळा मध्ये कोणकोणते काटे असतात?

घड्याळा मध्ये तास कटा, मिनिट काटा, सेकंद काटा असे काटे असतात.

एका तासात किती मिनिट असतात?

एका तासात 60 मिनिट असतात?

Leave a comment