महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh in Marathi

 Mahatma Gandhi Nibandh in Marathi: मित्रांनो आज आपण महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

सत्य आणि अहिंसा परस्परांपासून अविभाज्य आहेत, असे गांधीजी मानतात तरीसुद्धा अहिंसा हे साधन व सत्य हे साध्य आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे; आणि त्यामुळेच अहिंसा हे सत्यान्वेषी मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य ठरते, असे गांधींना वाटते. ‘Mahatma Gandhi Nibandh in Marathi’

Mahatma Gandhi Nibandh in Marathi

  • हिंसेच्या साम्राज्यात ज्यांनी अहिंसेच्या सिद्धान्ताचा शोध लावला त्या ऋषींना ते न्यूटनपेक्षाही अधिक थोर संशोधक व वेलिंग्टनपेक्षाही अधिक थोर लढवय्ये मानतात.
  • कशी चालवावयाची याचे ज्ञान झाल्यानंतर ती कशी विफल आहेत, याची त्यांना जाणीव झाली व हिंसेने नव्हे, तर अहिंसेने मुक्ती होईल, असे त्यांनी जगाला सांगितले, असे गांधी म्हणतात.
  • ‘पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही वस्तुमात्राला व प्राणिमात्राला विचाराने, शब्दाने वा कृत्याने संभवणारी
  • दुखापत टाळणे म्हणजे अहिंसा,’ अशी अहिंसेची व्याख्या गांधींनी ‘हरिजन’मधील एका लेखात केली आहे.
  • क्रोधाने, स्वार्थासाठी व हेतुपूर्वक कुणाला इजा करणे वा ठार मारणे ही जशी हिंसा आहे, तशीच कुणाविषयी
  • मनात दुष्ट भावना बाळगणे हीसुद्धा हिंसाच आहे, कारण केवळ संधी मिळत नसल्यामुळे वा समाज भयामुळेच ती भावना प्रत्यक्षात आणली जात नसते, असे गांधीजी म्हणतात.
  • त्यांच्या मते, अशा कोणत्याही स्वरूपाच्या हिंसेला मनात थारा मिळता कामा नये. Mahatma Gandhi Nibandh in Marathi

अहिंसा जाणीवयुक्त क्लेश

  • दुष्टासमोर शरणागती पत्करणे,असा अहिंसेचा अर्थ नाही, आणि तसा तो गांधींना तर मुळीच अपेक्षित नाही.
  • दृष्टाच्या मनोदयाचा विरोध करण्यासाठी आपल्या संपूर्ण आत्मबलाचा उपयोग करणे म्हणजे अहिंसा अशीही अहिंसेची व्याख्या गांधीजी करतात.
  • मानवाच्या इतिहासात गांधींना अहिंसेच्या तत्त्वाचीच उत्क्रांती दिसून येते.  नरमांसभक्षणापासून शेतीजन्य-धान्यभक्षणापर्यंत व एकाकी हिंस्र भटकेपणापासून कौटुंबिक जीवनापर्यंत,
  • टोळ्यांपासून राष्ट्रापर्यंत जो विकास झाला, तो वरील उत्क्रांतीचीच साक्ष देतो, असे त्यांना वाटते. अहिंसेची वाढ व हिंसेची घट झाली नसती, तर मानवजातीचे अस्तित्व केव्हाच संपुष्टात आले असते.
  • सर्व धर्मांच्या प्रेषितांनी व अवतारांनीही अहिंसेचीच शिकवण दिली आहे, असे गांधीजी म्हणतात. भारत दुबळा आहे म्हणून त्याला अहिंसेचाच मार्ग योग्य, असा विचार गांधींजींनी केला नव्हता. ‘Mahatma Gandhi Nibandh in Marathi’

महात्मा गांधी निबंध मराठी

किंबहुना, त्यांची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा नव्हतीच. उलट भारताला आपल्या आत्मिक-आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि आत्मविश्वासपूर्वक स्वातंत्र्यलढ्यात तो उभा राहावा,अशीच गांधीजींची अपेक्षा होती.

शस्त्रास्त्र-शिक्षणाची त्यासाठी गरज नाही. ती गरज वाटणे हेच गांधींच्या मते आपल्या दौर्बल्य भावनेचे प्रतीक आहे. आपल्याला आत्मा असून तो अमर आहे. तो सर्व प्रकारच्या प्राकृतिक दुर्बलतेवर मात करू शकतो व संपूर्ण जगाशी टक्कर देऊ शकतो,याची त्यांना भारताला जाणीव करून द्यावयाची होती.

अहिंसेला गांधीजी सर्वश्रेष्ठ बल मानीत असत.  त्याला ते ‘आत्मबल’ किंवा ‘माणसातील ईश्वरी बल’ असे संबोधतात. हे निश्चितच सत्य आहे की, अपूर्ण असलेला माणूस अहिंसेचे पूर्ण आकलन करू शकत नाही. तिचे प्रखर तेज त्याला सहन करता येत नाही; परंतु तिचा अत्यल्प अंशसुद्धा आपल्यात जेव्हा जागृत होतो, तेव्हा चमत्कार घडून येऊ शकतो. ज्या माणसाच्या अंगी अहंभाव, अहंमन्यता असेल तेथे अहिंसेचे वास्तव संभवत नाही.  विनम्रतेखेरीज अहिंसा अशक्य आहे.

Mahatma Gandhi Nibandh in Marathi

अर्थात, ही विनम्रता म्हणजे दुबळेपणा नक्कीच नव्हे!  संपूर्ण साम्राज्याला आव्हान देणारे धैर्य एका व्यक्तीच्या ठायी निर्माण करणाऱ्या अहिंसेला दुर्बलता कसे समजता येईल? अशी अहिंसा दुर्बल असूच शकत नाही, तसेच ती दुर्बलांचीही असू शकत नाही. दुसऱ्याला न मारता मरण्याचे शौर्य फक्त अहिंसेचे तत्त्व अंगी बाणवणाराच दाखवू शकतो.

प्रतिशोध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुरुषार्थापेक्षा अपराध्यास क्षमा करण्यासाठी अधिक पुरुषार्थ हवा असतो, हेच खरे! गांधीजी अहिंसेला शौर्याची चरणसीमा मानतात. हिंसक माणूस एक वेळ अहिंसक होऊ शकेल; पण भेकड माणसाने अहिंसेचा अंगीकार करणे सर्वथैव अशक्य आहे, असे गांधीजींनी प्रतिपादले आहे. ही अहिंसेच्या मार्गावरून जाण्याची पहिली कसोटी होय. अहिंसेच्या मार्गावरून जाणे, हे दुर्बलांचे काम नव्हेच नव्हे! Mahatma Gandhi Nibandh in Marathi

तर मित्रांना तुम्हाला “Mahatma Gandhi Nibandh in Marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

महात्मा गांधींची घोषणा काय आहे?

भारत छोडो भाषण हे महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू करताना दिलेले भाषण आहे. याच भाषणात त्यांनी भारतीयांना निर्धाराचे आवाहन करताना ‘करो किंवा मरो’ चा नारा दिला.

गांधींचा मुख्य संदेश काय आहे?

गांधींचा विश्वास होता की प्रत्येक धर्माचा गाभा सत्य (सत्य), अहिंसा (अहिंसा) आणि सुवर्ण नियम आहे.

Leave a comment