पाणी आडवा पाणी जिरवा निबंध मराठी | Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi

Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi – मित्रांनो आज “पाणी आडवा पाणी जिरवा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi

हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो.

खेड्यापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम  पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते.

स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी! वास्तविक, भारत हा नद्यांचा देश आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा निबंध

भारताच्या काही भागांत पावसाचे पाणीही भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नद्यांना पूर येतात.

ब्रहमपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी नद्यांना येणाऱ्या पुरामुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत वारंवार येतात. याचा अर्थ असा कौ, उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.

धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशभरच्या नद्या एकमेकांना जोडून नद्यांचे जाळेच निर्माण करण्याची एक योजना सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. [Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi]

Pani Adva Pani Jirva Nibandh

पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खूप वर्षे लावणारी आहे. काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली, तरी अजून असे कितीतरी जिल्हे आहेत की, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कोल भाक्रा-नानगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसागर अशी धरणे भारतात ठिकठिकाणी बांधली गेली, ही गोष्ट चांगली आहे. [Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi]

पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण झाल्या. धरणांमुळे खेड्यापाड्यांत बीज पोहोचली हे चांगले झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन विहिरी कोरड्या पडल्या. नद्यांचे पाणी धरणांकडे खेचले गेल्यामुळे नद्या कोरड्या पडल्या.

विजेमुळे कारखाने सुरू झाले ही गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नद्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत. कौ, त्या शुद्ध करण्यासाठी कित्येक हजार कोटी रुपयांच्या योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. {Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi}

पाणी आडवा पाणी जिरवा

पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा पाण्याचे कितीही पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळीच खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत.

एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. झाडे आपल्या मुळांदूवारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत.

Pani Adva Pani Jirva

तसेच, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही दुसरी योजनाही युद्ध पातळीवर राबवायला हवी. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे, विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. “Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi”

तर मित्रांना “Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “पाणी आडवा पाणी जिरवा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment