सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi

Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi -: मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत, तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

सूर्य उगवला नाही तर असा विचार पण आपण करू शकत नाही. कारण सूर्य उगवला नाही तर आपली सगळी कामे होणार नाहीत. माणसाला जगायला जसे हवा, पाणी, निवारा यांची गरज आहे तशीच सूर्याची देखील गरज आहे. सूर्य उगवणे व मावळणे ही नैसार्गिक क्रिया आहे.

ही क्रिया होणार नाही असे होणार नाही. परंतु जर का असे झाले तर मानवाचे जगणे कठीण होईल. ऊन, पाऊस आणि हवा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील कोणतीही गोष्ट नसेल तर संसाराचा ताळमेळ बिघडून जाईल. लहान मुलांना जर सूर्य उगवला नाही तर चालेल का?

Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi 

हा प्रश्न विचारला तर त्यांना ह्या प्रश्नाची गंमत वाटेल. ते कदाचित असे म्हणतील की चालेल कारण त्यांना असे वाटेल की सूर्य उगवला नाही तर आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल. पण त्या लहान मुलांना सूर्याचे महत्व माहित नसते. पण ते आपल्याया त्यांना समजवावे लागणार.

सूर्य उगवला नाही तर झाडांना ऊन कोठून भेटणार. झाडांना जगण्यासाठी व मोठे होण्यासाठी जसे पाणी घालावे तसेच त्यांना सुर्याप्रकाश पण आवश्यक आहे. आपल्या पृथ्वीवरील वाढत्या प्रदुषणामुळे मानवाचे जगणे कठीण झाले आहे.  झाडांना सूर्यप्रकाश भेटला नाही तर ती झाडे सुकून जातील. झाडेच नसतील तर आपणाला ऑक्झिजन भेटणार नाही. “Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi”

झाडेच जगली नाहीत तर झाडांपासून मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपणाला मिळणार नाहीत. दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत.

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी

रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत, सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल. सूर्य उगवला नाही तर… दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदीविक्रीचे व्यवहार होणार नाहीत.

सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत.

असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi

हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य उगवला, सूर्य उगवला!’

Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi 

तर मित्रांनो  सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचली असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. ‘Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi’

 

 

Leave a comment