वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Nibandh Marathi

Vachal Tar Vachal Nibandh Marathi – मित्रांनो आज “वाचाल तर वाचाल निबंध मराठी ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

“वाचाल तर वाचाल,
ज्ञानी गुणवंत बनाल.
जग जिंकाल,
आपले ध्येय गाठाल”

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘वाचाल तर वाचाल !’ हा विचार सर्वांसाठी खूप मोलाचा आहे,कारण ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी महत्त्वाचे ज्ञान’ आणि ज्ञान मिळवण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे “वाचन’ होय.

Vachal Tar Vachal Nibandh Marathi

एक चांगले, सक्षम, कर्तबगार व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचन आपल्याला फायदेशीर ठरते, म्हणूनच म्हटले जाते ‘वाचाल तर वाचाल!’ वाचन बऱ्याच जणांना कंटाळवाणे वाटते, मात्र आजच्या या स्पर्धात्मक जगात युगात जर तुम्हाला टिकायचे असेल तर वाचन करणे, ज्ञान वाढवणे गरजेचे आहे.

जर का तुम्ही आपल्या ज्ञानात वेळेवर भर घातली नाही तर तुम्ही मागेच रहाल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण शिक्षकांकडून वाचनाचे महत्व नक्कीच ऐकले असेल. Vachal Tar Vachal Nibandh Marathi

मनुष्याजवळील सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याच्याजवळ असणारे ज्ञान रोय, या शक्तीच्या सहाय्यानेच तो हुशार, सुसंस्कृत बनतो. वाचनामूळेच अनेक व्यक्ती आदर्श बनल्या.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक बक्षिस म्हणून दिले होते. या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले.

आपणा सर्वांच्याच जीवनावर वाचनाचा खूप मोठा प्रभाव पडतो. मग आपल्या पाठ्यपुस्तकातील धडे- गोष्टी असो की श्यामची आई’, ‘श्रीमान योगी, ‘स्वामी‘, मृत्युंजय‘, यांसारखी असंख्य पुस्तके असोत. “Vachal Tar Vachal Nibandh Marathi”

त्यातून मिळालेले ज्ञान नवकीच आपल्या व्याक्तमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भर घालते. त्यांचे वाचन आपणास समृद्ध बनवते.
प्रत्येक विद्यायनि खेळा, अभ्यास करा पण त्याचबरोबर दररोज किमान एक पान तरी वाचन केले पाहिजे, असे मला वाटते.

Vachal Tar Vachal Nibandh Marathi

पण खेदाची गोष्ट म्हणजे ही वाचन संस्कृतीच नष्ट होत चालली आहे. टेलिव्हिजन, मोबाइल, कम्प्युटर (संगणक), व्हिडिओ गेम्स, चित्रपट, गाणे, काटुन यात आजचा विद्यार्थी असा गुरफटून गेला आहे की त्याला वाचन करावेसेच वाटत नाही.

मात्र मित्रांनो, असाहय ते साध्य, करता सायासा कारण अभ्यास, तुका म्हणे ॥” संत तुकारामांनी अतिशय सुंदर शब्दांत सांगितले आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, म्हणजेच जीवनमागविर ध्येयप्राप्ती साठी अभ्यास, ज्ञान, वाचन, प्रयत्न या गोष्टी आवश्यक आहेत.

वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. शब्द संपत्तीत भर पडते. विविध पुस्तकाचे वाचन केल्याने नवनवीन माहिती मिळून ज्ञानात आधिक पार पडते. मेंदूला चालना मिळून विचारविश्व अधिक व्यापक बनते. Vachal Tar Vachal Nibandh Marathi

शब्दांपत्तीत भर पडल्यामुळे आपण आपला अभ्यास अधिक चांगल्याप्रकारे करू शकतो. चांगल्या वाईट गोष्टी समजण्यास मदत होते. आपली कल्पना शक्ती वाढते. वाचनामुळेच आपण आषण, निबंधलेखन चांगल्याप्रकारे करू शकतो.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

वाचनामुळेच वेगवेगळ्या व्याक्तमत्त्वांची, महापुरुषांची माहिती आपणास होते. जगातील घडामोडींची माहिती होते. वाचनामुळेच आपल्याला नोकरीची संधी मिळते. वाचनामुळेच आपले व्याक्तिमत्व आकर्षक, सुसंस्कृत, प्रभावी बनत. अशाप्रकार वाचन हे आपणा सर्वांसाठी उपयुक्त आहे.
“वाचनाची कास धरूया
आपला विकास साधुया.
दररोज वाचन करुया,
वाचनाने समृद्ध बनुया.”

तर मित्रांना “Vachal Tar Vachal Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “वाचाल तर वाचाल निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

वाचाल तर वाचाल हा विचार कोणाचा आहे?

वाचाल तर वाचाल हा मोलाचा विचार डॉ.बाबासाहेब आंबेकर यांचा आहे.

Leave a comment